
उमेदवार होण्यापेक्षा उमेदवार पाडणारे बना, त्यात मोठा विजय-मनोज जरांगे-पाटील
उमेदवार होण्यापेक्षा उमेदवार पाडणारे बना, त्यात मोठा विजय आहे,” असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा बांधवांना केले आहे.सगेसोयऱ्यांचा निर्णय घेईल, त्या व्यक्तीच्या बाजूने राहू, असेही त्यांनी स्पष्ट केले. तळवडे येथे आयोजित कीर्तन सप्ताहासाठी जरांगे-पाटील आले होते. त्यावेळी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना ते म्हणाले, ”मराठा समाजामध्ये सरकारबाबत शंभर टक्के रोष आहे.तो या निवडणुकीत नक्कीच दिसेल. आम्हाला आरक्षण महत्त्वाचे आहे. त्यामुळे, आम्ही कुठेही उमेदवार दिला नाही किंवा कुठल्या पक्षाला पाठिंबा दिला नाही. ही निवडणूक मराठा समाज आपल्या हातात घेईल आणि ज्याला पाडायचे आहे, त्याला नक्कीच पाडेल. मला बाजूला करण्यासाठी गृहमंत्र्यांनी अनेक प्रयत्न केलेत, परंतु मी बाजूला झालो नाही. सध्या खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे. www.konkantoday.com