
मोदी सरकार आता शेतकरी आंदोलनातील नेत्यांशी बुधवारी चर्चा करणार
राजधानी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांच्या प्रचंड आंदोलन सुरू आहे केंद्रातील मोदी सरकार आता बुधवारी (दि. 30) चर्चा करणार आहे. मात्र, ही चर्चा सशर्त असेल. तीन कृषी कायदे रद्द करावे यावर आम्ही ठाम आहोत, असे शेतकरी नेत्यांनी स्पष्टपणे बजावले आहे. या चर्चेत तोडगा निघतो का याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, नववर्षाच्या सुरुवातीला १ जानेवारीला देशभरात शेतकरी निदर्शने करीत आंदोलने करणार आहेत.
www.konkantoday.com