जिल्ह्यातील शेती बागायतींसाठी उपद्रवी ठरत असलेले वानर, माकड यांची पकड मोहीम सुरू होणार

जिल्ह्यातील शेती बागायतींसाठी उपद्रवी ठरत असलेली वानरे, माकडे यांना पकडून अभयारण्यात सोडण्यासाठी वनविभागाकडून सर्व सोयींनी युक्त तसेच हाताळण्यास आणि वाहतुकीस योग्य अशा स्वतंत्र पिंजर्‍याची निर्मिती केल्यानंतर वाहतुकीसाठी दोन गाड्याही उपलब्ध झाल्या आहेत. येत्या १५ दिवसात ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार माकड, वानर पकडण्यााची मोहीम वनविभाग हाती घेणार असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकार्‍यांकडून देण्यात आली आहे.कोकणात आंबा, काजू, सुपारी, नारळ, फणस इत्यादी फळझाडांचे तसेच बांबू व फुलझाडे यांचाा मोहोर, फुलोरा, पालवी इत्यादीचे वन्यप्राण्यांकडून नुकसान होण्याच्या घटना घडत असल्याने यासंदभांत नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात दोन वर्षापूर्वी कोकणाती आमदारांनी सरकारचे लक्ष वेधल्यानंतर सरकारने एक अभ्यास गट नियुक्त केला. या अभ्यास गटाने विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना सुचवतानाच वानर, माकडांचे निर्बिजीकरण करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार आता माकड, वानर यांचे निर्बिजीकरण करण्यासाठी राज्य सरकारने प्रधान मुख्य वनसंरक्षक गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्ट स्थापन केला आहे. तसेच आता जिल्हा वनविभागाने वानर, माकडांना पकडण्याची मोहीमही आखली आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button