
रामदास कदमांनी घोटाळे केल्याचा अनिल परबांचा आरोप; सोमय्यांकडे देणार पुरावे
_ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि शिवसेना नेते रामदास कदम यांच्यातलं राजकीय वैर दिवसेंदिवस वाढत चालल्याचं दिसून येत आहे. अनिल परब यांनी मंगळवारी रामदास कदमांचा घोटाळा बाहेर काढला असून सगळे पुरावे किरीट सोमय्या यांच्याकडे देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना अनिल परब म्हणाले की, रामदास कदम यांनी शासकीय पदाचा वापर करुन गैरव्यवहार केला आहे. आज दोन प्रकरण किरीट सोमय्यांना देतो आहे. येत्या काही काळात बारा ते तेरा प्रकरण बाहेर काढणार असून सोमय्यांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी रामदास कदम आणि त्यांच्या दोन मुलांना जेलमध्ये टाकावं.परब पुढे म्हणाले, रामदास कदम यांच्या मुलाला प्रदूषण महामंडळ दिलेलं आहे, जे निकषात बसत नाही. तरीही दिलेलं आहे. पूररेषेच्या आतमध्ये असलेलं बांधकाम महामंडळाच्या अध्यक्षांनी केलेलं आहे. किरीट सोमय्यांनी याची दखल घ्यावी. नागडा पोपट म्हणून सोमय्यांचा उल्लेख होतोय, हा पोपट सगळीकडे उडत उडत फिरतोय.. ज्या पद्धतीने महाराष्ट्राने तुम्हाला बघितलं आहे.. जरा घराच्यांची तरी कदर करा. दुसरा कुणी असता तर लाजेने बाहेर पडला नसता.”आम्हाला बघायचंय सोमय्यांची किती ताकद आहे, कदमांच्या विरोधात काय करतात ते बघूयात. रस्त्यासाठी १५ गुंठे जागा दिली परंतु १८ गुंठ्याचे पैसे घेतले.. मंत्रिपदाचा गैरफायदा घेतला. त्यामुळे कदमांवर कारवाई झाली पाहिजे. सोमय्या हे महाराष्ट्राचे तथाकथित अण्णा हजारे आहेत, यात लक्ष घालतील का, हाच प्रश्न आहे.”खेडच्या प्रकरणात रामदास कदमांनी पुढाकार घेतला होता. कदमांनीच खेडचं प्रकरण सोमय्यांकडे दिलं होतं. त्यामुळे सोमय्यांनीच हे प्रकरण तडीस न्यावं, अशी आमची मागणी असल्याचं परब म्हणाले. कदमांच्या विरोधात मी जिल्हाधिकारी आणि संबंधित कार्यालयांकडे पाठपुरावा करणार असल्याचही त्यांनी सांगितलं.www.konkantoday.com