
रत्नागिरी नगर पालिकेच्या वित्त विभात लिपिकपदावर कार्यरत असलेल्या निनाद खानविलकर यांचे दुःखद निधन
रत्नागिरी नगर पालिकेच्या वित्त विभात लिपिकपदावर कार्यरत असलेल्या निनाद खानविलकर यांचे सोमवारी मुंबई येथे उपचारादरम्यान निधन झाले.मृत्यू समयी ते ४७ वर्षांचे होते.काही महिन्यांपुर्वी त्याला रत्नागिरीत अपघात झाला होता. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या निधनाने पालिकेसह रत्नागिरी शहरावर शोककळा पसरली आहे.
मॉर्निंगवॉकसाठी गेलेल्या निनाद खानविलकर यांचा फिनोलेक्स कॉलनी समोर काही महिन्यापूर्वी अपघात झाला होता. हा त्याचा दुसरा अपघात होता.सकाळी मॉर्निंगवॉकसाठी बाहेर पडलेले असताना पहाटे त्यांना गाडीने उडवल्याची घटना घडली होती. त्यांना तात्काळ कोल्हापूरला येथील रुग्णालयात हलवण्यात आले होते.कोल्हापुरात उपचार घेवून त्यांना अधिक उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आले होते.
त्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना रत्नागिरीतील त्यांच्या घरी आणण्यात आले होते. परंतु काही दिवसापूर्वी त्याची तब्येत बिघडल्याने त्यांना मुंबईला उपचारासाठी परत हलवण्यात आले होते. सोमवारी सकाळी त्याचे उपचारादरम्यान निधन झाले. निनाद खानविलकर हे उत्कृष्ठ, प्रमाणिक कर्मचारी होते व सगळ्यांना सहकार्य करणारे मनमिळावू व सतत हसत राहणारे म्हणूण ते सर्वांना सुपरिचित होते.
त्यांच्या पश्चात आई-वडिल, पत्नी, मुलगी, भाऊ व वहिनी असा परिवार आहे. निनाद यांच्या निधनाने खानविलकर कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.
www.konkantoday.com