रत्नागिरी तालुक्यातील नाखरे परिसरात दिवसाढवळ्या पाळीव प्राण्यावर बिबट्याचा हल्ला

रत्नागिरी तालुक्यातील नाखरे परिसरात दिवसाढवळ्या पाळीव प्राण्यावर बिबट्याने हल्ला केल्याने गावामध्ये पुन्हा एकदा बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. वनविभाग बिबट्याला पकडण्यासाठी अथक प्रयत्न करत असूनही बिबट्या मुक्त संचार करत असल्याने येथील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
मेर्वी परिसरात दोन वेळा माणसांवर हल्ले केल्यानंतर वनविभाग सतर्क झाला. त्याला पकडण्यासाठी त्यांनी लावलेल्या सापळ्यात न अडकता त्यांना हुलकावणी देत तो मुक्त संचार करीत आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button