
रत्नागिरी जिल्ह्यातील रूग्णालयांचे आरोग्य सुधारण्यासाठी मुंबईत बैठक
रत्नागिरी ः रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा रूग्णालय व ग्रामीण रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र यांना वेगवेगळ्या समस्या भेडसावत असून यासाठी त्यामध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत बैठक आयोजित केली होती. या बैठकीला आ. राजन साळवी, आ. सदानंद चव्हाण, आ. भास्कर जाधव यांचेसह जिल्ह्यातील सर्व प्रमुख आरोग्य अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत जिल्ह्याच्या रूग्णालयातील अपुरे वैद्यकीय अधिकारी, भुल तज्ञ, टेक्निशियन यांची रिक्त पदे यावर चर्चा करण्यात आली.
जिल्ह्यातील रूग्णालयाचे आरोग्य सुधारावे यासाठी आ. राजन साळवी व आ. सदानंद चव्हाण यांनी आरोग्यमंत्र्यांकडे मार्ग काढण्याची मागणी केली होती.