
आता शासनाच्या निर्णयामुळे कोकण कृषी विद्यापीठ प्रकल्पग्रस्तांना ५० टक्के आरक्षण.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ उभारणीसाठी ज्यांची जागा अधिग्रहीत करण्यात आलेली आहे अशा प्रकल्पग्रस्तांना विद्यापीठाच्या नोकरीत आता ५० टक्के आरक्षण प्राप्त होणार आहे. सदर अध्यादेश नुकताच शासनाकडून पारित करण्यात आल्याने प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला आहे.दापोली तालुक्यातील वाकवली पट्ट्यातील अनेक शेतकर्यांच्या जमिनी कोकण कृषी विद्यापीठाच्या स्थापनेच्या वेळी अधिग्रहीत करण्यात आल्या होत्या. तेव्हापासून येथील स्थानिक शेतकर्यांचे विद्यापीठात नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू होते. याकरिता अनेक आंदोलने करण्यात आली. मात्र अनेक दशके लोटली तरी हा प्रश्न प्रलंबित राहिला होता. मात्र नुकत्याच झालेल्या शासन निर्णयानुसार या प्रकल्पग्रस्तांकरिता विद्यापीठाच्या नोकरीत ५० टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय झालेला आहे.www.konkantoday.com