हवामानाच्या बदलाचा परिणाम होतोय हापूस आंब्याच्या पिकावर

सततच्या बदलत्या हवामानामुळे ऐन हंगामात हापूसच्या पिकावर परिणाम होत आहे याचा परिणाम म्हणून काही भागात आंबा गळती वाढली आहे. त्याचा फटका पुढील टप्प्यातील आंबा उत्पादनावर होणार आहे. गळती थांबवयाची कशी, या चिंतेत शेतकरी पुन्हा औषध फवारण्या करत आहेत. पंधरा दिवसांपूर्वीपर्यंत आंबा बागायतदार मोहोर वाचवण्यासाठी फवारण्या करत होते. परिणामी, खर्चात मोठी वाढ झाली आहे.यंदा आंबा उत्पादन वाढेल, अशी शेतकऱ्याला सुरवातीला आशा होती; पण वाढत्या उन्हाचा प्रभाव आंब्याला त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे यंदा हापूस आंबा हंगाम अपेक्षित भर घालेल, असे चित्र नाही. अद्याप हवेत रात्री गारठा असून दिवसा उष्मा आहे. त्यामुळे आधी मोहोर न आलेल्या सर्व झाडांना आता चौथ्या टप्प्यात मोहोर आला. या मोहोराला अद्याप फळधारणा नसली तरी फुलोरा मात्र चांगला झाला आहे. मोहोर आलेल्या झाडावर लहान फळे गळू लागली आहेत शिवाय मोहोरावर तुडतुडा, थ्रीप्सचा प्रादुर्भाव आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button