
पाणीपुरवठा पाईपलाईनला तडा गेल्याने मिरकरवाडा-पंधरामाड- आलीमवाडी परिसरात पाणी नाही
उद्यमनगरकडून मिर्याकडे येणार्या पाणीपुरवठा पाईपलाईनला तडा गेल्याने मिरकरवाडा-पंधरामाड-आलीमवाडी परिसरात शनिवारी पाणी नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. शिमगा आणि रमझान सुरु असल्याने पाणी पुरवठा आज होऊ शकला नाही. त्यामुळे जनतेतून संताप व्यक्त होत आहे. दुपारपर्यंत पाईपलाईनचे काम पूर्ण झाले तर संध्याकाळी पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी मिरकरवाडा येथील सामाजिक कार्यकर्ते निसार दर्वे, शब्बीर वस्ता, बाबामिया मुकादम यांनी केली आहे. सदर ठेकेदारांवर हलगर्जीपणा करुन जनतेला त्रास दिल्याबद्दल प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. एकतर आठवड्यात पाच दिवस पाणी मिळते आणि त्यातच पाईपलाईन फोडून पाण्याचा मोठ्या प्रमाणात व्यय झाल्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.www.konkantoday.com