चिपळूण तालुक्यातील पाच गावांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा सुरू

__उन्हाच्या झळा वाढत असतानाच तालुक्यातील पाणीटंचाई वाढू लागली आहे. मागील आठवड्यात चिपळूण तालुक्यातील पाच गावांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा सुरू झाला होता.चार दिवसांत त्यामध्ये आणखी तीन गावांची भर पडली आहे. आगवे, अडरेसह अनारी गावांतही शुक्रवारपासून टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला आहे. काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. उन्हाचे चटके अधिक बसू लागल्यानंतर पाणीटंचाईही तीव्रपणे जाणवू लागली आहे. सोमवारी तालुक्यातील पहिला टँकर कोंडमळा धनगरवाडीत धावला. त्यानंतर कुडप, सावर्डे, कादवड येथील धनगरवाड्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जाऊ लागला. टेरव येथील ग्रामपंचायतीने केलेल्या मागणीनुसार संपूर्ण गावाला टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. आगवे-लिबेवाडी, मधलीवाडी, अडरे धनगरवाडीत तर शुक्रवारी अनारी येथे प्रशासनाकडून पाण्याचा टँकर सुरू करण्यात आला आहे.www.konkantoday.co

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button