
विधानसभा निवडणुकीत मतदान न केल्याने १० वर्ष कुटुंबावर बहिष्कार टाकल्याचा आरोप
विधानसभा निवडणुकीत मतदान केले नाही म्हणून चिपळूण तालुक्यातील गाणे गुरववाडीतील एकाा कुटुंबावर ०१४ पासून वाडीतील ग्रामस्थांनी बहिष्कार टाकल्याची खळबळजनक घटना पुढे आली आहे. या प्रकरणी संबंधित कुटुंबाने गावातील चार प्रमुखांवर कारवाई व्हावी व न्याय मिळावा, यासाठी तहसील कार्यालयासह अलोरे शिरगाव पोलीस स्थानकाकडे अर्ज केला आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी चौकशीची प्रक्रिया सुरू केली असून येत्या काही दिवसात यासंदर्भात बैठकही होणार असल्याची माहिती मिळत आहे.यासंदर्भात प्रमोद प्रकाश गजमल (३४, गाणे-गुरववाडी) यानी दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले की, २०१४ मध्ये मी एमबीएचे शिक्षण घेत होतो. मतदानाच्या दिवशी परीक्षेला जावे लागले व उशिरा परत आल्याने मतदान करता आले नाही, याचा राग मनात धरून त्यावेळी आयोजित करण्यात आलेल्या सभेला मला बोलावण्यात आले. त्यानुसार वाडीचा खजिनदार असल्याने माझ्याजवळ असलेली कागदपत्रे घेवून मी या सभेला गेलो.सभेमध्ये वाडीचा खजिनदारपदाचा आर्थिक व्यवहार जमा करा व गावात ठरल्याप्रमाणे एका विशिष्ठ पक्षाला मतदान न केल्यामुळे तुम्हाला गावाने वाळीत टाकण्याचा निर्णय एकमुखाने घेतल्याचे सांगणत आले. यावेळी मी पेपरसाठी गेल्याने मतदानाला जाण्यास मिळालेले नाही, मी चुकलो असेन, माफी मागतो अशी विनंती केली असता यापुढे कोणतेही सहकार्य राहणार नाही असे सांगून सभेतून जाण्यास सांगितले. तेव्हापासून सार्वजनिक कार्यक्रम, मंदिर प्रवेश, ग्रामस्थांजवळ बोलण्यास बंदी आहे. www.konkantoday.com