पोलिसांनी केलेल्या सुचनेनंतर जगबुडी पुलाच्या मोकळ्या जागेत बसवले गर्डर.

मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे नव्या जगबुडी पुलावर झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर ’हॉटस्पॉट’च्या ठिकाणी सुरुवातीला बसवलेले गर्डर हटवून रिकामी पिंप उभे करण्याची मलमपट्टी राष्ट्रीय महामार्ग खात्याने केली होती. याप्रश्नी पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अधिकार्‍यांना केलेल्या सूचनेनंतर अपघात स्थळाजवळील मोकळ्या जागेत गर्डर बसवून मार्ग काहीअंशी सुरक्षित करण्यात आलो आहे. कर्ली-देवरुख येथे अंत्यसंस्काराला जाणारी किया कार जगबुडी नदीत कोसळून ६ जणांना प्राणास मुकावे लागले.

नव्या पुलावरील वळणामुळे यापूर्वी अपघातांची मालिका सुरूच होती. मात्र राष्ट्रीय महामार्ग खात्याने हाताची घडी अनब तोंडावर बोट ठेवण्यातच धन्यता मानली. येथील अपघात रोखण्यासाठी चुकीच्या ठिकाणी गर्डर उभे करण्यात आले. टीकेनंतर गर्डर हटवून त्याठिकाणी रिकामी पिंप उभी करण्यात आली. या तकलादू मलमपट्टीने राष्ट्रीय महामार्ग खाते पुन्हा टीकेचे धनी बनले. आता त्याठिकाणी दोन गर्डर बसवून मोकळा मार्ग बंद करण्यात आला आहे. याशिवाय धोकादायक मार्ग म्हणून दिशादर्शक फलक देखील लावण्यात आला आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button