रिक्षाचालक कल्याणकारी मंडळाच्या स्थापनेसाठी शासनाकडून 50 कोटींची तरतूद ,रिक्षाचालकांना कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यावर 50 हजार रुपयांची मदत

_रिक्षाचालक कल्याणकारी मंडळाच्या स्थापनेसाठी शासनाकडून 50 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे मंडळाच्या स्थापनेनंतर रिक्षाचालकांना कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यावर 50 हजार रुपयांची मदत मिळणार आहे.यासोबतच विविध फायदेदेखील रिक्षाचालकांना मिळणार आहेत. 2005 सालापासून प्रलंबित असलेली रिक्षाचालकांची ही मागणी अखेर पूर्ण झाली. त्यामुळे रिक्षाचालकांकडून शासनाच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.शासनाने आमच्यासारख्या रिक्षाचालकांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना केली. आम्ही खूप आभारी आहोत. हे कल्याणकारी मंडळ स्थापन व्हावे, ही मागणी खूप जुनी होती. ती आता पूर्ण झाली.रिक्षाचालकांना कल्याणकारी मंडळ मिळावे, ही मागणी 20 वर्षांपासून होती. ती पूर्ण झाली खरी, मात्र, रिक्षाचालक मालक यांच्यासाठी स्वतंत्र महामंडळ हवे होते. शासनाने आता यात टॅक्सीचालकांना देखील भरले आहे.मंडळांतर्गत रिक्षाचालकांना या सुविधा मिळणारजीवन विमा, अपंगत्व विमा योजनाआरोग्यविषयक लाभकर्तव्यावर असताना दुखापत झाल्यास अर्थसाहाय्य योजना (50 हजार रुपयांपर्यंत)पाल्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनामहाराष्ट्र कामगार कौशल्य वृद्धी योजनाwww.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button