
मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातात ५ जण गंभीर जखमी
मुंबई-गोवा महामार्गावरील महाड हद्दीतील लोहारमाळनजिक टाटा सुमोने उभ्या ट्रकला मागून धडक देत अपघात केल्याची घटना रविवारी सकाळी ७.१५ वाजता घडली. अपघातात ५ जण गंभीर जखमी झाले असून एक किरकोळ जखमी झाला आहे. दरम्यान या गंभीर जखमींमध्ये लांजातील दोघांचा समावेश आहे. जखमींना उपचारासाठी डेरवण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.आदित्य जयवंत कामत (३२, लांजा-सुतारवाडी), रूक्मिणी विठोबा शिंदे, प्रियंका प्रकाश शिंदे, सुनंदा नारायण शिंदे (र्व रा. नांदेड भगतेवाडी), संदेश सदानंद माने (लांजा-जाधववाडी) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. त्यांच्या हाता-पायासह डोक्याला गंभीर दुखापती झाल्या आहेत. संजय दत्ताराम भगते यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे. सर्वप्रथम जखमींना पोलादपूर शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती गंभीर बनल्याने डेरवण रूग्णालयात दाखल केले आहे.चालक आदित्य कामत हा एम.एच. ०४ एफ.आर. २६९२ क्रमांकाच्या टाटा सुमोतून ६ जणांना घेवून मुंबईहून रत्नागिरीकडे जात होता. लोहारमाळनजिक आला असता साईडपट्टीवर उभ्या असलेल्या जी.जे. १९/एस. ६८३० क्रमांकाच्या ट्रकला मागून धडक दिली. www.konkantoday.com