रत्नागिरीतील श्री स्वामी समर्थ सेवा, सांस्कृतिक, आध्यात्मिक व बालसंस्कार केंद्राचा २६वा वर्धापनदिन १९ मे रोजी.

रत्नागिरी : शहरातील साळवी स्टॉप-नाचणे लिंक रोडवरील श्री स्वामी समर्थ सेवा, सांस्कृतिक, आध्यात्मिक व बालसंस्कार केंद्राचा (दिंडोरी प्रणित) २६ वा वर्धापन दिन सोमवारी (१९ मे) संपन्न होत आहे. यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.१९ मे रोजी सकाळी ७ वाजता श्री स्वामीं वर पूजा अभिषेक केला जाईल. ८ वाजता भूपाळी आरती, सकाळी ८.३० ते १० यावेळेत श्री सत्यनारायण महापूजा, सकाळी १०.३० वाजता महाआरती त्यानंतर तीर्थप्रसाद, सकाळी ११ ते १२.३० यावेळेत स्वामी याग, दुपारी १२.३० ते २ यावेळेत महाप्रसादाचे वाटप केले जाईल. त्यानंतर दुपारी २ ते सायंकाळी ६ यावेळेत सेवेकऱ्यांना आलेले अनुभव कथन करतील. सायंकाळी ६.३० वाजता नैवेद्य आरती होईल.श्री स्वामी समर्थ सेवा, सांस्कृतिक, आध्यात्मिक व बालसंस्कार केंद्राच्या (दिंडोरी प्रणित) सर्व कमिटी सभासद, आजीव सभासद, सेवेकरी आणि भाविकांनी या कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button