अपघातामधील ट्रक जाळल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल.

. रत्नागिरी ः तालुक्यातील चाफे तिठा येथे ट्रकने दुचाकीला घासपटत नेले. या अपघातात स्वाराचा जागीच मृत्यू झाला. संतप्त नागरिकांनी ट्रक पेटवून दिला. यामध्ये ट्रकसह दुचाकीही जळली. ट्रक पेटविल्या प्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदू बेंद्रे, संकेत ढवळे, दीपक चौगुले अशी ट्रक जाळणाऱ्या संशयितांची नावे आहेत. ही घटना मंगळवारी (ता. १) सकाळी साडेअकराच्या सुमारास जाकादेवी ते चाफे जाणाऱ्या रस्त्यावर चाफे तिठा येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी निलेश सुरेश कळंबटे (वय ३३) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार जाकादेवी ते चाफे रस्त्यावर मंगळवारी ट्रक व दुचाकीचा अपघात झाला. या अपघातामध्ये स्वाराचा जागीच मृत्यू झाला. अपघातातील ट्रक व त्याचे सोबत घासपटत आलेली दुचाकी चाफे तिठा येथे उभी होती. सकाळी साडे अकराच्या सुमारास संशयित चालत घटनास्थळी आले. त्यांनी त्यांच्यासोबत पेट्रोल भरुन आणलेल्या प्लास्टीकच्या बाटलीचे बूच काढून पेट्रोल अपघातातील ट्रकच्या आत (केंबीन)मध्ये बाटलीसह फेकून माचीसच्या काडीने आग लावून ट्रकचे नुकसान केले. यामध्ये ट्रकसह दुचाकीही जाळली. या प्रकरणी निलेश कळंबटे यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी तीन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button