
उष्मा वाढल्याने पाण्याची पातळी घटली, खेडमध्ये पाणी टँकरची मागणी वाढली
खेड तालुक्यात उष्म्याने कहर केला असून उपलब्ध जलस्त्रोत तळ गाठत आहेत. यामुळे ग्रामस्थांची भटकंती सुरू आहे. तालुक्यातील खोपी येथील अवकिरेवाडी, मानेवाडीतील ग्रामस्थांपाठोपाठ आणखी ३ गावातील ११ वाड्यांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाल्याने टँकरच्या पाण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज दाखल केले आहेत. या गाव-वाड्यांच्या सर्वेक्षणानंतर दाखला प्राप्त होताच टँकरने पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.www.konkantoday.com