
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यातील एकेरी वाहतूक तात्पुरती बंद
कोकणातील प्रमुख सणांपैकी एक सण असलेल्या शिमगोत्सवासाठी रहदारी व अपघात होऊ नयेत, म्हणून कशेडी घाटाला पर्याय असणार्या रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला जोडणार्या कशेडी बोगद्यातून मुंबईहून कोकणात जाणार्यांसाठी एकेरी वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यात आली होती. मात्र बोगद्याला जोडणार्या महामार्गावरील पुलांचे काम कालपासून सुरू असल्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून बोगद्यातील एकेरी वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता नीरज चोरे यांनी दिली आहे. पुढील दोन दिवस बोगद्यातून सुरू असलेली एकेरी वाहतूक बंद ठेवण्यात आली असून मुंबईत येणार्या वाहनांना पुन्हा कशेडी घाटातून वळवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.मुंबई-गोवा महामार्गावरील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला जोडणार्या आणि अवघड अशा कशेडी घाटाला पर्याय असणार्या कशेडी बोगद्यातून मार्च अखेरपर्यंत बोगद्याची एक मार्गिका सुरू करण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने सांगितले.www.konkantoday.com