वंदे भारत मंगळूरपर्यंत चालवण्याचा रेल्वेचा डाव, प्रवाशांकडून जोरदार विरोध

कोकण मार्गावरून धावणार्‍या मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसला कोकणवासियांचा प्रचंड प्रतिसाद लाभत असून रेल्वे प्रशासनाच्या तिजोरीतही भर पडत आहे. वंदे भारत एक्स्प्रेस ८ डब्यांऐवजी १६ डब्यांची चालवणे गरजेचे बनले आहे. मात्र मुंबई-मडगाव वंदे  भारत एक्सप्रेस मंगळूरपर्यंत चालवण्याचा घाट सुरू असून यास आक्षेप असल्याचे निवेदन कोकण विकास समितीचे अध्यक्ष जयवंत दरेकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह लोकप्रतिनिधी व रेल्वे प्रशासनालाही दिले आहे.कोकण मार्गावरून धावणारी २२२२९/२२२३० क्रमांकाची मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसची सेवा सुरू झाल्यापासून कोकणवासियांचा भरभरुन प्रतिसाद लाभत आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button