चिपळूण शहरातील पानगल्लीसह रस्त्यांवर अतिक्रमण करणार्‍या व्यावसायिकांवर नगरपरिषदेची कारवाई.

चिपळूण शहरातील पानगल्लीसह अन्य भागात रस्त्यावर पुन्हा अतिक्रमण करणार्‍या व्यावसायिकांचे बुधवारी नगर परिषदेच्या भरारी पथकाने साहित्य जप्त केले. यामुळे व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र दुसरीकडे गौवळकोटरोडवरील बड्यांचे २० टक्के अतिक्रमण आजही तसेच आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई कधी होणार, असा सवाल अन्य व्यावसायिकांमधून उपस्थित होत आहे.गेल्या दोन महिन्यांपासून मुख्याधिकारी विशाल भीसले यांनी शहरातील अतिक्रमणावर जेसींची फिरवण्यास सुरुवात केली आहे. याचा परिणास म्हणून शहर मोकळे झाले आहे.

शहराच्या वैभवात यामुळे भर पडली आहे. त्यामुळे पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून मुख्याधिकारी भोसले यांनी भरारी पथक तयार केले आहे हे पथक दिवस-रात्र शहरात फिरत आहे. त्यामुळे अतिक्रमण बांबले आहे. असे असताना पानगल्लीसह काही भागात व्यावसायिक भाजीपाला, आंबे व अन्य साहित्य घेऊन रस्त्यांवर विकत असल्याची माहिती या पथकाला मिळाली.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button