महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी 16 एप्रिलपर्यंत लांबणीवर

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी 16 एप्रिलपर्यंत लांबणीवर पडली आहे. सरकारच्या 4 ऑगस्ट 2022च्या अध्यादेशामुळे मागील दोन वर्षे या निवडणुका रखडल्या आहेत.यामध्ये मुंबई महापालिकेसह 23 महापालिका, 25 जिल्हा परिषदा, 284 पंचायत समित्या, 207 नगरपालिका व 13 नगरपंचायतींचा समावेश आहे.2021मध्ये महाविकास आघाडी सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्य संख्येत वाढ केली होती. त्याआधारे राज्य निवडणूक आयोगाने प्रभागरचना, आरक्षण तसेच मतदार यादीची कार्यवाही पूर्ण केली होती. मात्र नंतर सत्तेत आलेल्या सरकारने 4 ऑगस्ट 2022 रोजी अध्यादेश काढला आणि राज्य निवडणूक आयोगाची ती कार्यवाहीच रद्द केली. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका खोळंबल्या आहेत.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button