
अर्जुना, कोदवलीतील गाळ उपशासाठी सुमारे एक कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता
राजापूर शहराला भेडसावणार्या पुराच्या समस्येवर मात करण्यासाठी गतवर्षी नाम फाऊंडेशन सहकार्याने राजापूर नगर परिषद व महसुल प्रशासनाने लोकसहभागातून शहरातील अर्जुना व कोदवली नदीपात्रातील सुमारे ३ लाख ७७ हजार घनक्युबिक मीटर गाळ उपसा केला असला तरी अद्यापही या नदीपात्रात गाळ काढण्यासाठी सुमारे एक कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. त्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आता शहरवासीयांतून होत आहे. www.konkantoday.com