नवी मुंबईतील वाशी येथील ए.पी.एम.सी. बाजारात काेकणातून पाच हजार आंबा पेट्या विक्रीसाठी

साऱ्यांना भुरळ घालणारा ‘हापूस’ आता बाजारात दाखल झाला आहे. नवी मुंबईतील वाशी येथील ए.पी.एम.सी. बाजारात साेमवारी काेकणातून पाच हजार आंबा पेट्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्या.यामध्ये सर्वाधिक (६० टक्के) हापूस पेट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तर ४० टक्के आंबारत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील आहेत. बाजारात दाखल झालेल्या आंबा पेटीला सध्या दोन ते पाच हजार रुपये इतका भाव मिळत आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा मोठ्या प्रमाणावर बाजारात येत आहे. त्या तुलनेने रत्नागिरीचे प्रमाण अल्प आहे. सध्या रात्री गारठा व दिवसा उष्मा, असे तापमान असले तरी शेतकरी तयार आंबा काढून विक्रीला पाठवू लागले आहेत.काही ठराविक बागायतदारांकडेच पहिल्या टप्प्यातील आंबा असून, ताे मुंबई, पुणे बाजारात विक्रीसाठी पाठविला जात आहे. गतवर्षी याच दिवसात पाच ते सहा हजार पेट्या विक्रीला येत होत्या, असे वाशी येथील विक्रेत्यांनी सांगितले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button