सागरी महामार्गावरील काळबादेवी-मिऱ्या येथील खाडीवर पूल उभारण्यासाठी दुसऱ्या टप्प्यातील माती परिक्षणाला सुरुवात

रत्नागिरी:- रेवस-रेड्डी सागरी महामार्गावरील काळबादेवी-मिऱ्या (ता. रत्नागिरी) येथील खाडीवर पूल उभारण्यासाठी दुसऱ्या टप्प्यातील माती परिक्षणाला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात किनारी भागात केलेल्या परीक्षणाचा अहवाल सकारात्मक आला आहे. खाडीतील पाण्यामध्ये तीन ठिकाणी माती परीक्षण केले जाणार असून त्याचे काम महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने (एमएसआरडीसी) डीबीएम कंपनीला दिले आहे. हे काम वीस दिवस सुरू राहणार असून त्याचा अहवाल आल्यानंतर पुलाची निविदा प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.कोकणाला लाभलेल्या समुद्र किनाऱ्यावरील पर्यटनाला चालना देण्यासाठी शासनाने एमएसआरडीसीच्या माध्यमातून रेवस-रेड्डी हा सागरी महामार्ग बनविण्याचा निर्णय घेतला आहे. जयगड ते पावस या टप्प्यात काळबादेवी आणि भाट्ये खाडीवर पूल उभारण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात काळबादेवी-मिऱ्या या दोन गावांमधील खाडीवर पूल उभारण्यासाठी पावसाळ्यापूर्वी मे २०२४ मध्ये दोन ठिकाणी माती परीक्षण केले होते. त्यामध्ये खाडीपासून दोनशे मिटर अंतरावर मिऱ्या आणि काळबादेवी गावातील मातीचे नमुने मुंबईतील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्या ठिकाणी पिलर उभारण्यास आवश्यक जागा असल्याचा अहवालही प्राप्त झालाआहे. दुसऱ्या टप्प्यात खाडीतील पाण्यामध्ये उभारण्यात येणाऱ्या पिलरसाठी तीन ठिकाणी माती परीक्षक केले जात आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button