
*मुंबई-गोवा महामार्गाचे काम डिसेंबरअखेर पूर्ण होईल -**पालकमंत्री उदय सामंत*
_नागरिकांनी आपसातील मतभेद दूर ठेवून विकासाच्या पाठीशी उभे राहणे गरजे आहे. हातखंबा गावात साडेपाच कोटींची विकासकामे होत आहेत. गावांच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले. तसेच येथील मुंबई-गोवा महामार्गाचे काम डिसेंबरअखेर पूर्ण होईल आणि मेपर्यंत एक लेनचे काम पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले.हातखंबा-तारवेवाडी-निवळी रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भूमिपूजन पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते झाले. या वेळी सिंधुरत्न समृद्धी योजनेचे निमंत्रित सदस्य किरण सामंत, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबू म्हाप, माजी नगरसेवक सुदेश मयेकर, सरपंच जितेंद्र तारवे, मुन्ना देसाई, सत्या म्हापुसकर, सागर म्हापुसकर, प्रमोद डांगे आदी उपस्थित होते.www.konkantoday.com