*मावळंगेतील आंबा व्यावसायिक शशिकांत सामंत यांचे निधन*

___रत्नागिरी येथील मावळंगे गावचे रहिवासी असलेेले शशिकांत तातोबा सामंत यांचे २३ फेब्रुवारी रोजी वयाच्या८६ व्या वर्षी अल्पशा आजाराने मुंबई येथे  निधन  झाले.कुडाळ देशकर आद्य गौड ब्राह्मण युवक मंडळाचे अध्यक्ष योगेश सामंत यांचेते वडील होत. गणित विषयात बीएससी  ऑनर्स पदवीधारक असलेल्या सामंत यांनी काही वर्षे शाळा, कॉलेजमध्ये गणित विषयाचे अध्ययन केले. मॅप्को पेपर मिलमध्ये रिजनल हेड म्हणून नोकरी केल्यानंतर त्यांनी काही वर्षे स्वतःच्या प्रिंटींग प्रेसचा व्यवसाय केला. मुळचे कोकणातील असलेल्या सामंत यांनी पावस मावळंगे-हर्चे परिसरातील आंबा बागायतदारांना १९८१ च्या दरम्यान चांगला दर देवून मुंबई बाजारपेठेत सामंतांचे हापूस आंबे या नावाने हापूस ब्रॅण्ड विकसित केला होता. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button