
*मग आता जरांगेंच्या तोंडून तुतारीचे आवाज बाहेर येत आहेत का?-भाजप आमदार नितेश राणे*
____मनोज जरांगेंची ही सगळी आंदोलनं, शिव्या शाप देण्याची हिंमत कुणाच्या जोरावर सुरु आहे. जरांगेंचे जुने सहकारी आता सांगत आहेत की, ते पवार साहेबांच्या जवळचे आहेत. मग आता जरांगेंच्या तोंडून तुतारीचे आवाज बाहेर येत आहेत का?असा सवाल भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. ते सोमवारी माध्यमांशी संवाद साधत होते.नितेश राणे म्हणाले की, “मनोज जरांगेच्या जवळच्या सहकाऱ्याने सांगितलं की, ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या लोकांच्या जवळचे आहेत. स्थानिक आमदारांबरोबर त्यांच्या बैठका होतात. जरांगेंनी जर राजकारण सोडून भुमिका घेतली तर आम्ही सगळे त्यांच्या सोबत आहोत. पण सरकार घाबरलं आणि आम्ही सागर बंगल्यावर येणार असं ते म्हणतात. सागर बंगल्यावर येणं फार लांबची गोष्ट आहे, आमची भिंत तिथे आहे. ती भिंत पार करणं ही केवळ स्वप्नातली गोष्ट आहे.””मराठा समाजाशी आमची लढाई नाही. पण जर एखादा व्यक्ती मराठा समाजाला वेठीस धरुन समाजाची बदनामी करत असेल तर हे खपवून घेतले जाणार नाही. त्यामुळे समाजातील तरुणांनी उगाच अंगावर गुन्हे घेऊ नयेत कारण उद्या केसेस काढण्यासाठी कुणीही येत नाही,” असे ते म्हणाले.ते पुढे म्हणाले की, “हे सगळे आंदोलनं, शिव्या शाप देण्याची हिंमत कुणाच्या जोरावर सुरु आहे. जरांगेंचे जुने सहकारी आता सांगत आहेत की, ते पवार साहेबांच्या जवळचे आहेत. मग आता हे तुतारीचे आवाज बाहेर येत आहेत का? तोंडाने तुतारी वाजवण्याचे काम सुरु आहे का? कधीतरी या सगळ्या गोष्टी स्पष्ट व्हायला हव्याwww.konkantoday.com