*दगडफेकीची चौकशी करून कारवाई करा-माजी आमदार डॉ. विनय नातू*_
____चिपळूणमध्ये बीजेपीच्या रॅलीवर केलेली दगडफेकीबाबत उद्धव ठाकरे गटाचे आमदार व जिल्हाप्रमुख भारतीय जनता पार्टीवरती टीका करण्याचा प्रयत्न करतात ही सर्व त्यांची कृत्य म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असा आरोप बीजेपीच्या नेत्यांवर व रॅलीवर झालेली दगडफेक याची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी भाजपाचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी केली आहे.डॉक्टर विनय नातू यांनी पत्रकारांजवळ संवाद साधताना जिल्ह्यामध्ये विविध नेत्यांचे दौरे होत आहेत. निवडणुका जवळ आल्याने पुढच्या काळातही अनेक नेत्यांचे दौरे होणार आहेत. उद्धव ठाकरेंचा दौरा येथे होता, त्यात दौर्याच्या वेळी अन्य कोणत्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना चिपळूणमध्ये कोणी बोलावलं नव्हतं. यांना उद्धव ठाकरेंना ऐकायचं होतं ते आले आणि गेले पण भारतीय जनता पार्टीचे नेता जेव्हा एखाद्या सभेकरता येतात त्यावेळी मुंबई-गोवा हायवेवरील चिपळूण येथील कार्यालयात असणार्या कार्यालयामध्ये ठाकरे गटाच्या जिल्हाभरातील कार्यकर्त्यांना एकत्र बोलवायचं, त्यांच्या समोरच चिथावणी करून भाषण करायचं. कार्यालय सोडून बाहेर बॅरिकेट पर्यंत येवून पोलिसांना वाटेेल ते बोलायचे, हातवारे करायचे, या पद्धतीचं वर्तन जे लोकप्रतिनिधी करतात ते मात्र दुसरीकडे लगेच जावून संस्कृतीच्या गोष्टी शिकवतात. ज्यांना शारदा मातेच्या देवळातली ज्यांची भाषा या रत्नागिरी जिल्ह्याला सर्वांना माहिती आहे. www.konkantoday.com