*वन्य प्राण्यांची शिकार केल्याप्रकरणी सहा जण ताब्यात, आंबोली वनपरिक्षेत्रातील घटना*

*_______वन्य प्राण्यांची शिकार केल्याप्रकरणी सहा जण ताब्यात घेण्यात आले आहेतआंबोली येथील वनक्षेत्रात वन्य प्राण्यांची शिकार केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या कार मध्ये प्राण्याचे केस आढळून आले आहेत. त्यामुळे त्या संशयितांनी साळींदराची शिकार केली असावी, असा वन अधिकाऱ्यांचा प्राथमिक अंदाज आहे.या प्रकरणी ६ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई रविवारी पहाटेच्या सुमारास आंबोली हिरण्यकेशी परिसरात करण्यात आली आहे.यात फरान समीर राजगुरू (२६), नेल्सन इज्माईल फर्नांडिस ( ४२) दोघे (रा.सालईवाडा-सावंतवाडी), बाबुराव बाळकृष्ण तेली (४२, रा. सावंतवाडी जेलच्या मागे), सर्फराज बाबर खान ( ३४), रजा गुलजार खान (२३) दोघे (रा. बांदा गडगेवाडी),अरबाज नजीर मकानदार (२६, रा. माठेवाडा) आदींचा यात समावेश आहे. त्यांच्यावर वन्य प्राणी संरक्षण कायद्याचा भंग करणे तसेच मनाई आदेश असताना हत्यारे घेऊन फिरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, असे वनअधिकारी विद्या घोडगे यांनी सांगितले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button