
*आपण राजनीती नाही तर राष्ट्रनीतीसाठी बाहेर पडलो आहोत-पंतप्रधान नरेंद्र मोदी*
__पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, भाजपचा कार्यकाळ देशसेवेसाठी काहींनाकाही करतच असतो.देश आता प्रगती करत आहे. सत्तेसाठी तिसरा कार्यकाळ मागत नाहीये, सर आणखी काही निर्णय घेण्यासाठी सत्ता मागत आहे, असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी येणाऱ्या काळातील आणखी काही मोठ्या निर्णयांचे संकेत दिले आहेत. पुढील १०० दिवस नवी उर्जा, नवा उत्साह, नवा विश्वास, नव्या उमंगसह काम करावे लागेल. विरोधी पक्षातीले नेते देखील म्हणत आहेत एनडीए ४०० चा आकडा पार परेल. एनडीएला ४०० पार करायचं असेल तर भाजपला ३७० चा मैलाचा दगड गाठावा लागेल. आपण राजनीती नाही तर राष्ट्रनीतीसाठी बाहेर पडलो आहोत, असं मोदी म्हणाले.www.konkantodaycom