*मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटातील संरक्षण भिंतीचे काम अद्यापही अपुरे*

_मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटातील दुसऱ्या लेनचे काम पूर्ण झाले तरीही अद्याप दरडीच्या बाजूने संरक्षक भिंत उभारण्याचे काम अपूर्ण आहे. काही ठिकाणी दरडीच्या बाजूने केलेल्या भरावावर पावसाळ्यापूर्वी दगडी पिचिंग करणे आवश्यक आहे. परशुराम घाटातील काम अतिशय मंद गतीने कामकाज सुरू असल्याने स्थानिक ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण गेली १७ वर्षे रखडले आहे.दरडीच्या बाजूने संरक्षक भिंत उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते; परंतु आता या कामाची गती पूर्णपणे मंदावली आहे शिवाय रस्त्यावरही अनेक ठिकाणी काँक्रिटीकरणाला तडे गेले आहेत; परंतु काही मोजक्याच भागात आधीचे काँक्रिटीकरण तोडून पुन्हा काँक्रिटीकरण केले जात आहे. त्यामुळे पावसाळ्यात आणखी रस्ता खचण्याची भीती व्यक्त केली जात आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button