
*मुंबई गोवा महामार्गावर* *आरवली ते तळेकांटे भागात**कंत्राटदाराने सुरक्षिततेबाबत काळजी न घेतल्याने वाढते अपघात*
__मुंबई-गोवा महामार्गाचे काम नियोजनाअभावी कोणतीही सुरक्षितता न पाळता सर्व नियम धाब्यावर बसवून काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे.त्यामुळे आतापर्यंत अनेक अपघात झाले असून, त्यात प्रवाशांना प्राण गमवावे लागले आहेत.आरवली ते तळेकांटे भागाचे काम करणाऱ्या कंपनीचे काम ढिसाळ व नियोजनशून्य आहे. ज्या ज्या ठिकाणी महामार्गाचे काम करताना वाहतू्क अन्य मार्गे वळवण्यात आली आहे तिथे रिबिन बांधलेली आहे; मात्र या व्यतिरिक्त आरवली ते तळेकांटे भागात कोणतीही खबरदारीचे बोर्ड वा पुरेशी काळजी घेतलेली नाही. त्यामुळे नेहमीच छोट्या-मोठ्या अपघातांचा सामना वाहनचालकांना करावा लागत आहे. काहीजणांना जीव गमावावा लागला आहे. काही ठिकाणी खडीमातीच्या धूळीचे साम्राज्ज असल्याने दुचाकी वाहनचालकांचे मोठ्या प्रमाणात अपघात व अपघातात जखमींची संख्या वाढत आहे. या प्रकारामुळे मुंबई-गोवा महामार्ग हा शाप की वरदान, असा विचार करण्याची वेळ आली आहेwww.konkantoday.com