*महाराष्ट्र सरकारला मिळणार AI तंत्रज्ञानाचा आधार! Google सोबत झाला सामंजस्य करार*
__महाराष्ट्र सरकारने आज तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक मोठे पाऊल उचलले. कृषीक्षेत्र, आरोग्यसेवा आणि शिक्षण यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजे AIचा वापर करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने गुरुवारी सर्च इंजिन कंपनी गुगलसोबत सामंजस्य करार केला.या सामंजस्य करारावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गुगल इंडियाचे कंट्री हेड आणि उपाध्यक्ष संजय गुप्ता आणि राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांच्या उपस्थितीत कंपनीच्या कार्यालयात स्वाक्षरी करण्यात आली.www.konkantoday.com