मराठा आरक्षणासाठी १५ फेब्रुवारीला विधानसभेचे विशेष अधिवेशन


मुंबई:- मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी उभारलेल्या लढ्याला मोठं यश आलं आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने सर्व अटी मान्य करत अधिसूचना काढत मराठा आरक्षण देण्यासंदर्भात ठोस आश्वासन दिलं होतं. आता मराठा आरक्षणासाठी १५ फेब्रुवारीला विधानसभेचं विशेष अधिवेशन घेण्यात येणार आहे.

अधिवेशनात मागासवर्ग आयोगाचा अहवाल मांडला जाणार आहे. नव्याने केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे कायदा बनवला जाण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशनात विधेयक मांडलं जाण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षण देण्याचं राज्य सरकारने आश्वासन दिलं आहे. तरीही येत्या १० फेब्रुवारीपासून मनोज जरांगे पुन्हा आमरण उपोषणाला बसणार आहेत. मराठा आरक्षणाचा कायदा पारित करावा आणि आरक्षण लागू व्हावं म्हणून आमरण उपोषण करणार आहेत. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत कायमस्वरुपी टिकणारं आरक्षण दिल्याशिवाय शांत बसणार नाही, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button