
*सिंधुदुर्गातील अंदाजे २५ हजार गुंतवणूकदारांच्या ठेवी मैत्रेय कंपनीत अडकल्या*
__सिंधुदुर्गातील अंदाजे २५ हजार गुंतवणूकदारांच्या ठेवी मैत्रेय कंपनीत अडकल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या ठेवी लवकरात लवकर मिळाव्यात, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात कायदेशीर लढाई सुरू आहे.न्यायालयाने अद्याप मालमत्ता विकण्याचे आदेश दिले नाहीत. ते आदेश लवकरच दिले जातील यासाठी कोर्टात प्रयत्न सुरू आहेत. मात्र, महाराष्ट्र शासन आणि शासकीय अधिकाऱ्यांकडून झालेल्या ढिसाळपणाचा फटका गुंतवणूकदार, प्रतिनिधींना बसत आहे. त्याविरोधात आवाज उठविण्यासाठी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयावर लवकरच मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.www.konkantoday.com