कोल्हापुरात पंचगंगा नदी पात्राबाहेर, २९ बंधारे पाण्याखाली!


कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी मुसळधार पाऊस झाला. पावसाचा वेग वाढल्याने यंदा प्रथमच पंचगंगा नदी पात्राच्या बाहेर पडली आहे. तर, पंचगंगा नदीची पाणीपातळी ३० फूट झाली असून, जिल्ह्यात २९ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

कोल्हापूर शहरामध्ये पावसाचा जोर काल वाढला. दिवसभर पावसाच्या मोठ्या सरी येत होत्या. सायंकाळी रेड अलर्ट देण्यात आला होता. रात्री अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. धरण क्षेत्रात आणि घाटमाथ्यांवर जोरदार सरी कोसळत आहेत. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वेगाने वाढ झाली आहे. राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगा नदी ३०.४ फुटांवरून वाहत आहे. राजारामसह २९ बंधारे अद्यापही पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button