
सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करताना आरटीपीसीआर टेस्टची आवश्यकता नाही-खासदार विनायक राऊत
कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेऊन ज्यांना १५ दिवस झाले आहेत त्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करताना आरटीपीसीआर टेस्टची आवश्यकता नाही. महाराष्ट्राचे नियम पाळले जातील, असे खासदार विनायक राऊत यांनी स्पष्ट केले.कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेऊनही सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करताना आरटीपीसीआर टेस्ट सक्तीची केल्याने चाकरमानी नाराजी व्यक्त करीत आहेत. कारण मागील चार महिन्यांपासून सिंधुदुर्ग जिह्यातील आठही रेल्वे स्थानकावर अँटीजेन व आरटीपीसीआर टेस्ट सक्तीने केली जात आहे. यामुळे १०-१२ तास प्रवास करून येणाऱया चाकरमान्यांची चांगलीच दमछाक होत आहे. इतकेच नव्हे तर दोन डोस घेतलेल्या प्रवासांचीही सक्तीने टेस्ट केली जात आहे. म्हणूनच चाकरमान्यांनी नाराजी व्यक्त केली.
www.konkantoday.com