*जे काँग्रेसच्या कुबड्या घेऊन नाचत आहेत, त्यांनी कोणालाही लाथ घालायची भाषा करु नये – पालकमंत्री उदय सामंत यांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार*

______जे काँग्रेसच्या कुबड्या घेऊन नाचत आहेत, त्यांनी कोणालाही लाथ घालायची भाषा करु नये, असा पलटवार उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केला.मंगळवारी एका ऑनलाईन पत्रकार परिषदेत मंत्री सामंत यांनी ठाकरे यांच्या रत्नागिरी दौऱ्याबाबत टीका केली.आपण रत्नागिरीत ऐतिहासिक आणि धार्मिक कार्यक्रम केले. या दोन कार्यक्रमांच्या मध्ये एक मनोरंजनाचा कार्यक्रम करण्यात आला, अशी टीकाही त्यांनी ठाकरे यांच्या मेळाव्यावर केली. रत्नागिरीत छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या लोकार्पणाचा ऐतिहासिक आणि विठ्ठल मूर्तीच्या लोकार्पणाचा धार्मिक कार्यक्रम आपण केला. या कार्यक्रमांना रत्नागिरीकरांनी भरभरुन प्रतिसाद दिला, त्याबद्दल आपण आभारी आहोत, असे ते म्हणाले. या दोन कार्यक्रमांच्या मधे एक करमणुकीचाही कार्यक्रम होता, असे त्यांनी ठाकरे यांच्या सभेबद्दल सांगितले. आधी जे शिवाजी पार्कवर सभा घेत होते, त्यांच्यावर आता रस्त्यावर, बोळात, चावडीवर सभा घेण्याची वेळ आली आहे. ही सभा म्हणजे टोमणे आणि कुटुंबाच्या बदनामीचा कार्यक्रम होता, असे ते म्हणाले.आपण गद्दाराच्या पेकाटात लाभ घालायला आलो आहोत, असे पक्षप्रमुखांनी आपल्या भाषणात सांगितले. मात्र काँग्रेसच्या कुबड्या घेऊन नाचणाऱ्यांनी लाथ घालायची भाषा करु नये, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.गद्दारांना गाडायचे आहे, या उद्धव ठाकरे यांच्या बोलण्याची आपण पूर्ण सहमत आहोत. बाळासाहेब सांगायचे की मी शिवसेनेची कधी काँग्रेस होऊ देणार नाही. अशी वेळ आली तर आपण पक्ष बंद करू. पण आता ठाकरे शिवसेना काँग्रेससोबत गेली आहे. ही खरी गद्दारी आहे आणि ती गाडायला हवी आहे, अशी टीका मंत्री सामंत यांनी केली. आमचा व्यवसाय आहे, हे त्यांनी मान्य केले. अर्थात त्यांनी व्यवसायावर टीका केली असली तरी कोणताही व्यवसाय नसताना त्यांनी सहा मजली घर कसे बांधले, हा प्रश्न आपण आजपर्तंत कधीही विचारला नाही आणि यापुढेही विचारणार नाही, असे ते म्हणाले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button