हेल्मेट सक्तीसह दंड वसुली थांबविण्याची जिल्हा भाजपची मागणी

कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाचा गेल्या दोन महिन्यांपासून जिल्हयातील जनता संकटाचा सामना करीत असताना आता प्रचंड उष्म्याने हैराण झालेल्या दुचाकीस्वारांना हेल्मेटची सक्ती करण्यात येत असून हेल्मेट नसल्यास वाहतूक पोलिसांमार्फत त्यांच्याकडे सक्तीने ५०० रु. दंड वसुली केली जात आहे. उष्म्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना निदान या कालावधीत तरी सवलत मिळणे गरजेचे आहे. तोंडावर मास्क, डोक्यावर हेल्मेट अशा स्थितीत दुचाकीचालकांना प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे हेल्मेट सक्तीसह दंड वसुली मोहीम तात्काळ थांबवावी अशी मागणी जिल्हा भाजप दक्षिणचे अध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन तसेच प्रशांत डिंगणकर यांनी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button