राजापुरात १९ स्वयंचलित हवामान केंद्र मंजुरीसाठी प्रतिक्षेत*
*____हवामानातील बदलांचा कृषी विषयक अभ्यास करण्यासाठी आणि संभाव्य आपत्तीला सामोरे जाण्याच्या दृष्टीने नोंद ठेवण्यासाठी तालुक्यामध्ये विविध १९ ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणी करण्यात येणार होती. मात्र हा प्रस्ताव येत्या वर्षभरापासून मंजुरीच्या प्रतिक्षेत असल्याने या हवामान केंद्राची उभारणी केव्हा होणार याची प्रतिक्षा तालुकावासियांना लागली आहे.गेल्या काही वर्षामध्ये हवामानामध्ये सातत्याने बदल होत असून अवकाळी पाऊस, वादळ, तापमान वाढ अशा प्रतिकूल हवामानाचा फटका आंबा, काजू पिकांना बसत आहे.www.konkantoday.com