![](https://konkantoday.com/wp-content/uploads/2024/02/images-13.jpeg)
रत्नागिरी शहराचा पुढील ३० वर्षांचा पाणीप्रश्न मिटणार,नाचणे येथील जलशुद्धीकरण केंद्रातून शीळचे पाणीही शहरात सोडण्याची व्यवस्था
*_रत्नागिरी शहराची पाणीपुरवठ्याची समस्या आता जवळजवळ संपुष्टात येणार आहे. साळवी स्टॉप जलशुद्धीकरण केंद्राला नाचणे येथील जलशुद्धीकरण केंद्रातून शीळचे पाणीही शहरात सोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे रत्नागिरी शहराच्या वाढत्या विस्ताराची पुढील ३० वर्षातील लोकसंख्येची पाणीपुरवठ्याची असलेली गरज या पाणीपुरवठा योजनेमुळे मिटणार आहे.रत्नागिरी शहरात नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली. पण गेल्या अनेक दिवसांपासून येथील पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायम राहिला. काही भागात अनियमित पाणीपुरवठा होत राहिल्याने तेथे टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येत होती. शीळमधून साळवी स्टॉप येथील जलशुद्धीकरण केंद्र पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाले होते. नाचणे येथे उभारण्यात आलेल्या जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा सुरू होण्याची शहरवासियांना प्रतीक्षा लागून राहिली होती. पण साळवी स्टॉप येथील जलशुद्धीकरण केंद्राला जोडलेल्या आणि अनेक दिवसांची प्रतीक्षा असलेले नाचणे जलशुद्धीकरण केंद्र मंगळवार ३० जानेवारीपासून सुरू झाले आहे. www.konkantoday.com