
मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य-दिपक केसरकर
मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्याचे दिपक केसरकरांनी सांगितलं आहे. मनोज जरांगे यांनी आज सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली होती. ही चर्चा सकारात्मक झाल्याची माहिती आहेतर जरांगे यांच्या सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या असल्याची माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
मंत्री दीपक केसरकर माध्यमांशी बोलताना म्हणाले की, “मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. मनोज जरांगे पाटील हे संवेदनशील आहेत. ते महाराष्ट्राच्या हिताचा विचार करतील. आता मागण्या तर मान्य झाल्या. पण, त्याची अमंलबजावणी ही शासकीय विहीत नियम असतात त्याप्रमाणे होत असते. पंरतु महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं आहे की, आत्तापर्यंत आपण ३७ लाख कुणबी प्रमाणपत्र देऊ शकलो. आता ही नवी प्रकिया पुर्ण केल्यानंतर ही संख्या ५० लाखांच्या वरती जाणार आहे. त्यामुळे हा न्याय मिळवण्यामध्ये मनोज जरांगेंची भूमिका आहे. त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो”.
www.konkantoday.com