तलाठी भरतीत १५४ जण अद्याप प्रतीक्षा यादीत

राज्यभरात झालेल्या तलाठी भरती परीक्षेसाठी जिल्ह्यातून तब्बल ३६ हजार ८१७ परीक्षार्थीनी या पदभरतीसाठी अर्ज केला होता. १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत या परीक्षा पार पडल्या होत्या. जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार आता १५४ परीक्षार्थी अद्याप प्रतीक्षा यादीत असल्याचे दिसत आहे.राज्यभर भूमी अभिलेख विभागाकडून घेण्यात येत असलेल्या तलाठी परीक्षेसाठी १० लाख ४१ हजार ७१३ परीक्षार्थीनी अर्ज भरले होते. रत्नागिरी जिल्ह्यात यासाठी ३६ हजार ८१७ अर्ज भरण्यात आले होते. नुकतीच भूमी अभिलेखकडून प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार आता जिल्ह्यातील परीक्षार्थींपैकी २१४ उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थीची निवड यादीत नोंद झाली आहे तर १५४ परीक्षार्थी अद्याप प्रतीक्षा यादीत आहेत.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button