रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी उद्यानात विराजमान करण्यासाठी २२ फूट उंच विठ्ठल मूर्तीचे आगमन


रत्नागिरी येथील माळनाका परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी उद्यानात विराजमान करण्यासाठी २२ फूट उंच विठ्ठल मूर्ती काल आणण्यात आली. या मूर्तीचे वजन पावणे दोन टन आहे.
रत्नागिरी नगरपरिषदेच्या वतीने आणि राज्याच्या नगरविकास खात्यामार्फत या विठ्ठल मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी नगरउत्थान निधी अंतर्गत ही मूर्ती आणली असून लवकरच विधीवत स्थानापन्न करण्यात येईल.
पालकमंत्री उदय सामंत आज या ठिकाणी सकाळी पाहणी करणार आहेत
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button