
राजापुर शहरातील साईनगर पुनर्वसन भागातील सहा पदरीऐवजी चार पदरी रस्ता करणार
मुंबई – गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे राजापुर शहरातील साईनगर पुनर्वसन भागातील काही घरांना होणारा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
या भागामध्ये चौपदरीकरण करताना सहा पदरीऐवजी चार पदरी रस्ता करण्यात यावा. त्यात सर्व्हीस रोडचा समावेश असावा, अशी मागणी माजी आमदार हुस्नबानू खलिफे यांनी केली होती. त्याला महामार्ग प्रशासनाने मान्यता दिल्याचे खलिफे यांनी सांगितले. रस्त्याच्या सहा पदरीकरणामुळे या परिसरातील घरांना निर्माण होणारा संभाव्य धोका टळला आहे.
www.konkantoday.com