रत्नागिरी – मिर्‍या धुपप्रतिबंधक बधार्‍याचे काम खूप संथ गतीने


रत्नागिरी – मिर्‍या धुपप्रतिबंधक बधार्‍याचे काम खूप संथ गतीने सुरू आहे. याच गतीने काम सुरू राहिल्यास भाटकरवाडी ते जयहिंद चौक हा भाग डेंजर झोन आहे, त्या भागातील घरांना येणा-या मान्सूनपासून धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. आऱाखड्याप्रमाणे बंधार्‍याचे काम होत नसून ठेकेदार व पत्तन अधिकार्‍यांच्या मनमानी कारभाराने सुरू आहे. अशा बेकायदेशीर बंधा-यांच्या कामाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन भाटीमि-या धूपप्रतिनिबंधक बंधारा संवर्धन कृती समितीने पत्तन अभियंता श्री. हजारे यांना देण्यात आले आहे.
भाटकरवाडी व जयहिंद चौक येथील काम लवकरात लवकर सुरु न झाल्यास ग्रामस्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसू, असा इशाराही दिला आहे. समितीचे अध्यक्ष नागेश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने हे निवेदन दिले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button