
मानधनवाढीचे आश्वासन दोन महिन्यानंतरही हवेतच; पुन्हा संप, राज्यात ७२ हजार आशा, ३९०० गटप्रवर्तकांची परवड
राज्यातील आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांना काम जास्त अन् मोबदला कमी अशी अवस्था झाल्याने दोन महिन्यांपूर्वी पुकारण्यात आलेल्या संपात राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मानवाढीचे आश्वासन दिले.तद्नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही गटप्रवर्तकांच्या मानधनवाढीसह अन्य प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. मात्र, दोन महिने लोटले तरी अद्याप त्यावर शासन निर्णय होत नसल्याने ७२ हजार आशा व ३ हजार ९०० गटप्रवर्तकांमध्ये नाराजी वाढली असून शुक्रवारपासून पुन्हा संप सुरू केला आहे.
www.konkantoday.com