कर्ला येथे संजय वालम यांच्या घराची संरक्षक भिंत कोसळून लाखोंचे नुकसान.

रत्नागिरी शहर आणि परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरालगतच्या कर्ला येथे संजय वालम यांच्या घराची संरक्षक भिंत कोसळून लाखोंचे नुकसान झाले आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना रविवारी 25 मे रोजी रात्रीच्या सुमारास घडली.मिळालेल्या माहितीनुसार, संजय वालम यांच्या घराचे बांधकाम काही दिवसांपूर्वीच सुरू झाले होते. या घरासाठी चिऱ्याची संरक्षक भिंत उभारण्यात आली होती. मात्र, चार दिवसांच्या संततधार पावसामुळे ही भिंत कोसळली, ज्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button