
रीळ गावचे सरपंच व प्रगतशील शेतकरी मिलिंद वैद्य यांचे अपघाती निधन
रत्नागिरी तालुक्यातील रीळ गावचे सरपंच व प्रगतशील शेतकरी मिलिंद वैद्य (४३) यांचे गुरूवारी अपघाती निधन झाले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गुरूवारी भीषण अपघाताची घटना घडली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कारने विरूद्ध दिशेने येणार्या टँकरला जोरदार धडक दिली. पालघरमधील मेंढवण येथे ही दुर्दैवी अपघाताची घटना घडली. अपघातग्रस्त कारही गुजरातकडे निघाली होती. कार चालवत असताना नियंत्रण सुटल्याने ती टँकरवर जावून आदळली. त्यात कारचा चुराडा झाला. अपघातात तिघेजण ठार तर तीनजण जखमी झाले. वैद्य यांना कृषी क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल तरूण भारत सन्मान पुरस्कार देण्यात आला होता.
www.konkantoday.com